चाळीमध्ये गोट्यांचा खेळ रंगात आला होता ...माझ्या गोटया बर्यापैकी मी हरवून बसलो होतो .....दुपारचे चार -पाच वाजले होते ...एका बाजूला चाळीतील शिंद्यांची गादी पिंजारी नीट करत होता ...त्रोन्ग त्रोन्ग असा नाद मधेच तो काढायचा ...अचानक एक छोटा ट्रक सामान घेऊन जगतापच्या घरापाशी थांबला ...एक नुकतेच टक्कल केलेला माणूस केबिन मधून बाहेर पडला ...मागच्या बाजूने त्याने ट्रक मधून दोन टक्कल केलेली मुले बाहेर काढली ...नंतर एका मुलीला हाक मारून ...ताई ....ताई असे ओरडून बाहेर निघायला सांगितले .ट्रकवाल्याने एका चार वर्षाची एक जाडी पोट फुगलेली बुटकी चिमुरडी पोर बाहेर काढली .......तिचेच नाव ताई ....!
मुलाची आई वारल्याने बापाने सामान आणि पोरे घेऊन मोठ्या भावाकडे काही दिवसासाठी आणले होते ....मोठा मुलगा राम ...मधली ताई ...छोटा सुरेश ....सारे अवघडलेल्या मनाने ,भिरभिरत्या नजरेने सामान उतरवत असताना इकडे -तिकडे पाहत होते ...जगतापबाई कुठूनतरी येत होती ....तो ट्रक ..ती पोरे ..तिचा दीर पाह्यल्यावर तिथूनच शिवीगाळ करत आली ...माझेच घर बरे दिसले ..कारे भाडखावू....बायको मारली ..आता माझ्याकडे कशाला आलास .....काकुच्या ओरडण्याने पोरे रडू लागली ....जगतापबाईला दोन मुली ..आनू आणि रेणू ....जगतापबाबा बाहेर आला ..ते अंडरप्यांटवर ...बायकोला चार -दोन शिव्या देऊन म्हणाला ..माझा भाऊ आहे ,,मीच बोलावले आहे त्याला ....तू तुझी आई घाल तिकडे .....राहील कि सोय होईपर्यंत नंतर निघून जाईल ...उरावर बसायला आला नाही तो तुझ्यावर .......
हा सारा तमाशा सारी चाळ पाहत होती ....या सगळ्या नादात आमचे वडील आले आणि त्यांनी सर्व पोरांना शिव्या देवून हुसकावून लावले ....सगळ्यांना घरी जा असे हातवारे करत ...सायकल लाऊन घरात गेले ....मी ट्रकच्या पाठीमागे लपून सारे बघत होतो ...रामच्या कडेवरची ताई रडत होती ....तिची ढेरी फ्रोक मधून बाहेर दिसत होती ....सारेच चित्र उदासवाणे .......
.....ट्रक निघून गेला ...मी रामला दोस्त केले ...थोड्या गप्पा मारल्या ...त्याने सांगितले ..आमची आई मेली वीस -पंचवीस दिवस झाले ...आम्हाला या काकाशिवाय दुसरे कोणी नाही ..वडिलाची आई आहे ,पण ती म्हातारी आहे .मी त्याला म्हणालो ..काही लागल्यास मला सांग..
..दुसर्या दिवशी शाळेत पाहतो तर काय ...राम माझ्या शाळेत दाखल झाला त्याच्या लहान भावाबरोबर ...मधल्या सुट्टीत मी त्याला शाळा दाखवली .....शाळा संपल्यावर घरी सोबतच आलो ...आमच्या घरी त्याला नेले ...आईला आणि बहिणीला सांगितले हा राम ...चाळीत तोपर्यंत जगतापबाईने सारे रामायण सांगितले होतेच ..त्यामुळे आईला त्याच्याविषयी कळले होते ....
...थोड्यावेळाने तो ताईला आमच्या घरी घेऊन आला ...खेळायला .....ताई गोरीपान होती ..केसाच्या बटा झाल्या होत्या ...तीचे डोळे काळे करावान्दासारखे होते ....बोलायची तर फार गमतीशीर ...म्हणजे मधेच बोलताना हसायची ...आणि अंगाला हात लाऊन बोलायची ....मी म्हणालो काय ताई ...? खाऊ खायचा का ? यावर ती बोबड्या आवजात म्हणाली ..तुझे हात तर रिकामे आहेत ..? तू कायपण बोलतोस ...सगळे हसले ...मला जाम कौतुक वाटले तीचे....आईने रामला विचारले ....,राम हिची ढेरी मोठी कशी काय रे ? राम म्हणाला ..ती माती खूप खाते ....जेवण जास्त करत नाही ....मला काही कळले नाही ...मी आपला थोड्यावेळ खेळलो आणि अभ्यासाला बसलो ....
तीन -चार महिने गेले ...ताईला दवाखान्यात दाखल केले ...तिला नुसते जुलाब होत होते ....काही दिवसांनी तिला घरी आणले ..तिच्या हातापायाच्या काडया झालेल्या आणि पोट मोठेच राहिलेले ....त्यांचा बाप दुसर्या गावाला निघून गेला नवीन बदलीचे ठिकाण बघायला ......मुलाचे खाण्याचे हाल सुरूच होते ...राम भावाचे धुणे ..ताईचे धुणे आणि बाकीचे सारे कामे करायचा ......चुलता रोज दारू पिऊन ताईला चाळीभोवती फेर्या मारायला लावायचा ...का ...?...तर डॉक्टरने सांगितले म्हणून .....ताईला चालवत नसायचे ..ती चार -साडेचार वर्ष्याची पोर ...स्वताची ढेरी हलवत चालताना मधेच पडायची ....कुणी तिला धरले कि अंडरप्यांटवाले जगताप सर्वाना शिव्या घालायचे ....घोगर्या आवाजात ओरडायचे ...ताई थांबू नको ......तो आवाज ऐकला कि ताई मुसमुसत ..,गळके नाक हाताला पुसत ...चालायची ....मग काही वेळाने राम यायचा ..तिला पटकन कडेवर घेऊन पळत सुटायचा ...तोपर्यंत जगताप पायरीवर पिऊन आडवा झालेला असायचा .......राम तिला बाहेर फिरून आणायचा ...येताना गुलाबी साखरेचा कापूस घेऊन यायचा ........तिच्या डोळ्यात त्यावेळेला एक चमक दिसायची .....
..एक दिवस आम्हाला शाळेला सुट्टी होती ...आम्ही सारे गोट्या खेळत होतो ...ताईपण जवळ बसली होती .......खेळ रंगात आला असताना ...ताईने जागेवरच जुलाब करायला सुरवात केली ...ताईला श्वासपण घेताना त्रास होत होता ...रामने ताईला नीट आवरून चाळीतल्या शिंदेबाईला घेऊन तडक दवाखाना गाठला ......
.................दोन दिवसाने कळले ताई मेली .....आयुष्यात प्रथमच मी लहान मुलाची प्रेतयात्रा पाहत होतो .....आम्हाला सगळ्यांना घरी बसवण्यात आले होते ....राम फक्त गेला होता .
............दोन -तीन महिन्यांनी राम ,त्याचा भाऊ .,वडील दुसर्या ठिकाणी निघून गेले ...बारकासा ट्रक आला ....गाडीच्या पाठीमागे सामान धरत राम उभा होता ......माझ्या हातात रामने मला जिंकून दिलेल्या गोट्या होत्या .....त्यातली एक गोटी ताईच्या करवंदी डोळ्यासारखी चमकत होती ......बर्याचवेळ ........................................................ताई तू कुठे आहेस ग ?मला तुझी आठवण येतेय ..!
....